Wednesday, May 1, 2019

राधेला तुम्ही मुक्त केलंत देवपणातून
कुंती आणि द्रौपदीला दिलात माणूस असण्याचा अभिमान
आणि विस्मृतीत गेलेल्या मैत्रेयीला उभं केलंत
तत्त्वज्ञांच्या रांगेत खांद्याला खांदा लावून
त्यांनी वाद घातला, जाब विचारला देवत्व लाभलेल्या
सख्याला
तेव्हा त्यानेही विचार केला असेल मानवी पातळीवर येऊन.
कधी टागोर आले कवितेबाहेर
आणि महात्मा गेले 'सत्याच्या प्रयोगाच्या' पुढे
देवत्व दिल्या गेल्या सर्वांचे पाय मातीचेच आहेत कळलं तुमच्यामुळे.
ह्यातून त्यांचं मोठेपण मर्त्य नाही झालं.
तर आपले चांगले वाईट गुण घेऊन सामान्य माणूस होऊ शकतो अमर हे दाखवलंत...
तुम्ही माणसांना देवत्वाचं दार उघडून दिलंत ..
#अरुणा_ढेरे_अभिष्टचिंतन
2 फेब्रुवारी

No comments:

Post a Comment