Wednesday, May 1, 2019

न परतीच्या प्रवाशांना
थांबवू नये उंबरठ्यावर...
उंबरठ्यावर नेहमीच
क्लेश, वेदना...
त्यांना मोकळ्या मनानं जाऊ द्यावं सुखदुःखाच्या पार..
आणि मनावर दगड ठेवून
बंद करावं दार.
परसदारी लावावं त्याच्या कवितांचं एक झाड
जन्मांतरीच्या विस्मृतीनंतर
न जाणो
नवसंजीवनी घेऊन
कुठल्याशा प्रकाशमार्गाने
पुन्हा टपटपतील अज्ञेयाची फुलं
पुन्हा दरवळतील घरामधून..
पुन्हा वाहिली जातील कार्याय...
हे वर्तुळ अटल आहे ना?

No comments:

Post a Comment