Tuesday, July 10, 2018

त्याच्यासमोर मांडू नयेत गाऱ्हाणी, तक्रारी
ना उगाळावा दुःखांचा पाढा
ना विचारवं कुठल्याशा उःशापासाठी
तो दारी यायची वाट बघू नये
भांडू बिंडू नये, मागू नये काहीही
तो संवादाच्या पलीकडे आहे.
त्याला नकोय पंचपक्वान्नाचं ताट
किंवा अगदी मुठभर पोहेही
त्याचं फक्त दर्शन घ्यावं
क्षणभर डोळे मिटावेत
तादाम्य पावावं
एकमेकांत विलीन व्हावं..
मग आत्मन् पूर्ण करतात
हवं नकोचे सगळे व्यवहार
शेवटी भांडून बिंडूनही
फक्त हेच तर हवं असतं.

No comments:

Post a Comment