Monday, March 12, 2018

फळा होऊन जावा ओल्या कापडाने पुसल्यासारखा स्वच्छ,
किंवा सूर्य उगवताच काळ्याभोर पटलावरच्या तारका
धूसर होत होत मग व्हाव्यात दिसेनाशा..
किंवा
तप्त ग्रीष्माच्या दुपारी
अंधारून यावं आभाळ वळीवाच्या मेघांनी
आणि न कोसळताच पर्वतकड्यावरून निघून जावं,
वाऱ्याच्या वेगाने,
आणि काळ्याकभिन्न कातळाच्या टोकाला
उंची सांभाळताना बघताही येऊ नये
पाठ फिरून..
जेव्हा एक दिवस थांबून जातात
सखीच्या कविता, फोन्स, मेसेजेस..

No comments:

Post a Comment