Monday, March 12, 2018

तू म्हणालास उराशी बाळगलेलं हे अलौकिक स्वप्न
विसर्जित करून टाक कालिंदीमध्ये
ह्या माझ्या मर्यादा, हे माझे कृष्णकिनारे
त्याला नाही पार करता येणार ते..
आणि सोयीस्कर नाही असे अट्टाहास
हृदयाशी जपून ठेवणं...
मात्र खूप पुढे येतो आपण,
आता परतीचे मार्ग बंद होतात कधी ...
किनाऱ्यांची निवड आपल्या हातात नसते ना
तेव्हा जीव असा तरंगू द्यायचा पाण्यावर ..
त्यातले हेलकावे हेच त्याचं प्रारब्ध
हेच त्यांचे किनारे ..
मला माहित आहे मित्रा !

No comments:

Post a Comment