Saturday, February 28, 2015

सुखाने पाय पसरावे नि शब्दांनी मुके व्हावे
जरासे शांत होताना मनाने दूर का जावे?

कसे नाते हे दुःखाशी जे देते शब्द भरभरुनी.
मनी कल्लोळ जो उठतो रिता होतो शाईमधुनी.

वेदनेची जी मर्यादा स्वतःतून पार होवोनी.
जगाशी नाळ जुळावी नि सुखे दुःखे एक व्हावी.

नको काही ओळखीचे नसावा थांग भावनांचा.
नको गोंजारण्याकरिता डोंगर कल्पित दुःखाचा

निनावी दुःख लाभावे जरासा भाव बदलावा.
कवितेचा लेखणीचा झरा पुन्हा नवा वहावा.

No comments:

Post a Comment