Saturday, February 28, 2015

लक्ष्मीच्या पावलाने  घरात येताना
जपावी  चैत्रातल्या हिरव्या पानाची कोवळीक,
आणि लगेचच कळावं
प्रेमाच्या झरयातले चार शिंतोडेसुद्द्धा
उडणार नाहीयेत अंगावर,
तेंव्हा मग हरवावी कोवळीक ऑस्तुक्याची,
चेहरा होत जावा शुष्क शुष्क भेगाळलेला,
रंग होत जावा फिका फिका,
होत जाव्यात सगळ्याच छटा करड्या करड्या,
ओठांवरच विरावं गीत बहराचं,
आणि कर्कश्श वाटावी कोकिळेची तानही,
हे आजूबाजूला चालणारे आकांडतांडव !
हे भाजून काढणारं दग्ध वास्तव!
तसाच हा दुष्काळ!
त्यातून रात्र सरावी तळमळत,
आणि सकाळी उठून नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावताना
हात थरथरावा,
तसं नित्यनेमाने वर यावं हे भगभगीत बिंब!
आणि मग दिवस ढकलावा बेभरवशी आषाढाचं
दिवास्वप्नं पहात.

No comments:

Post a Comment