Tuesday, July 10, 2018

विचार फिरतात चक्रासारखे
होत राहतात त्यांचे पुनर्जन्म..
ना मिळते त्यांना सद्गती,
ना वसवतात ते एखादं गोकुळ
ते फक्त भटके की बेवारस
की आणिक काही?
अशा अनौरस भावनांना दिलेलं पालकत्व
म्हणजे तर कविता नाही?

No comments:

Post a Comment