Saturday, February 28, 2015

ह्या चिऱ्यांभोवती आता
का फिरकत नाही कोणी.
वाऱ्यावर उडून गेल्या
कवितेच्या कातर ओळी.

महिरपी काच तुकड्यांच्या
आरसे लख्खसे होते.
एखादी तिरीप तरलशी
अन लखलखाटी कवडसे.

समृद्ध नांदत्या महाली
का स्थीर स्तब्धता शिरली.
झगमगत्या भिंतींची का
खंडारे अवचित झाली.

पडक्या अवशेषातून
फिरणार कधी हा वारा ?
जागून कपारीमधुनी
घुमणार कधी हा रावा?

No comments:

Post a Comment