Friday, February 27, 2015

माझ्या शहरातून तुझ्या गावाकडे
जाणाऱ्या रस्त्यावर पाऊस सारखाच असतो खरंतर!
मात्र तो कधीही आला तरी
त्या टोकाला असते एक विवंचना.
तो कधीही आला तरी घेऊन येतो
टिकावाचा प्रश्न….
वेळेत येईल? आणि आलाच तर पुरेसा?
दुष्काळ, अवर्षण?
मात्र रस्त्याच्या शहरात घेऊन येणाऱ्या
ह्या टोकाला मी असते पाऊस झेलत…
चारदोन गारा वेचत…
पाऊस कधीही आला तरी माझ्यासाठी असतो तो
चित्तवृत्ती बहरून टाकणारा,
मातीच्या वासाने
भावनांना दाहवणारा,
कोणाच्या आठवणी कुरवाळणारा….
माझ्या काल्पनिक सुख दुखाःला गोंजारणारा…
माझ्या अंतप्रेरणेला जागवणारा….
त्यामध्ये मी विसरून जाते पावसाचं तांडव,
ज्या पावसात वाहून गेलेली असते
तुझी टिकावाची मुलभुत गरज….
रस्त्याच्या शहरातल्या ह्या टोकाला मी
आणि त्या टोकाला मला न दिसणारा तू…
अंतप्रेरणे पासून जाणीवांपर्यंतचं हे अंतर
कधी होणार पार मझ्याकडून…. ?

No comments:

Post a Comment